Saturday, September 5, 2009

अरुणोदयापूर्वी

साडेचौदाशे वर्षांपूर्वी चालुक्यांच्या अधिपत्याखाली, हजार वर्षांपूर्वी राष्ट्रकूटांच्या छत्राखाली, आठशे वर्षांपूर्वी शिलाहारांच्या राज्यात सातारा नांदत होता.
सातशे वर्षांपूर्वी हसन गंगू बहामनीनं कुलबर्ग्य़ाच्या राजधानीतून १३४७ मध्ये बहामनी राज्य उभं केलं. १३५७ मध्ये या राज्याच्या चार "तर्फ" केल्या. प्रत्येकावर तरफदार किंवा राज्यपाल नेमण्यात आले.
सातारा कुलबर्ग्याच्या तरफेत जमा झाला.

No comments:

Post a Comment