Monday, July 5, 2010


ताम्रपट
पूर्वी महत्वाच्या आज्ञा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवत. तांबे ठोकून त्याचा पत्रा बनवीत. त्यावर कोरणीने कोरत असत. एकापेक्षा अधिक पत्र्यांना कडीने एकत्र करीत असत. कडीच्या जोडावर खास मुद्रा असे.
असे पत्रे कोरणारे करणिक - कुलकरणिक. त्याचे प्रमुख करणाध्यक्ष. ज्यांच्याकडे असे पत्रे सुरक्षित ठेवत ते पटलाध्यक्ष (पाटील). या दोघांसमक्ष राजा दानपत्र प्रदान करीत असे.
वळई ताम्रपट
साता-यापासून  दक्षिणपूर्वेला जिल्ह्याच्या टोकाला, भोजलिंगाच्या डोंगराजवळ, काळेलांचा गाव आहे. गाव महाराष्ट्रात मातीपासून मीठ (मेंगेमीठ) बनवणा-या समाजाचे आहे - लोणारी समाजाचे !
गावाचा देव श्री भोजलिंग. म्हसवडच्या श्री सिद्धनाथ मंदीरात इथल्या सासन काठ्या जातात. यांच्याकडे वंशपरंपरेने ताम्रपट आहे. त्याला देवाइतकाच मान.    

No comments:

Post a Comment