Saturday, July 10, 2010

कालनिर्णय

  • ताम्रपट वाचणे सोपे आहे,त्याचा अर्थही लावणे सोपे आहे. मात्र कालनिर्णय सर्वात कठिण काम. 
  • या लेखात मानांक, देवराज, अविधेय याची नावे आली आहेत. सन्मान्य मिराशींच्या नोंदीनुसार अविधेय हा ४४० ते ४५६ दरम्यान होऊन गेला.
  • अक्षराचे वळण सर्वसाधारणपणे शतकाप्रमाणे बदलत जाते, भौगोलिक स्थितीनुसार बदलत जाते. प्रस्तुत वळण हे दुसरे शतक ई.स. नंतरचे आणि सहाव्या शतकापूर्वीचे आहे.
  • दान देण्याचे कारण चंद्रग्रहण" महामार्गशिर्ष वैशाखस्य चंद्रपरागे"
  • चंद्रग्रहण नेहमी पूर्णचंद्राला पौर्णिमेला होते. म्हणजे वैशाख पौर्णिमा ही तिथी आहे.

No comments:

Post a Comment